Wednesday, February 10, 2010
Gift or curse!
When I was a kid, I always used to think that is it an offence to take a birth in a female gender? There was a reason behind this thinking. I always saw my mother doing sacrifices for the sake of healthy family atmosphere. I saw my cousin elder sisters losing chances of further studies away from hometown as their brother’s higher studied were more important for the parents. It was a height for me when I saw my doctor brother-in law’s parents demanded money (as society calls it by the name of -Dowry) for their son’s marriage.
I asked my mother that is it a fine that the parents have to pay for giving birth to a girl child? My mother who herself is a teacher just smiled and answered, “Never be ashamed of being a girl, my dear. God has given the strength and special power to us. So be proud of it.” That day I decided that I will never let my self esteem down just for being a girl.
My parents felt always proud for being parents of two daughters. But the society has always been felt sorry for my parents as they don’t have a son. I don’t understand why people still think like this? The outside world is developing at the speed of light and we are not ready to open our eyes and change our mentalities! When I saw my elder cousin sisters crying for the reason of dowry, at that moment I decided that either I am not going marry at all or I will marry that guy who will not demand anything from my father.
I told my decision to my parents and again my mother told me something. She said, “It’s good that you want to change the mentality of our society. But you cannot change the thousand years old tradition, alone. Remember my dear, only few people think like you. People may break your expectations. So be prepared.” I still remember my mother’s words. And now it’s my time to face these things. I really get confused when my would be hubby reacts like an 18th century’s orthodox male chauvinist. At times he is very understanding and sometimes he dominates me just because I am a girl. That time I feel that just because of being a girl I have to listen to the harsh words, the domination and have to forget my own identity. When I complain about this, people tell me to be silent and be patient and learn to accept male domination. Otherwise my relation with my husband will come to an end. According to the society, when you are born as a female, then you are destined to face this. It is thumb rule that a women must always learn to swallow her insults, forget her identity and listen to what her father or brother or husband or son says and behave according to their order. Live according to their wish and forget about her self esteem, self respect and her own perceptions. Will anybody answer to my questions? Is it a punishment of being a girl? Who decided that a women must not have her own perceptions and identity in order to maintain the family atmosphere “HAPPY”? Is it a crime to born as female in 21st century too?
“Have a blast…But watch out for safety!”
Celebration is in the air. Everybody has their plans ready to spend the last evening of the year 2009 that is 31st December. One and all want to make the eve special. We all have our different tastes for parties and celebrations. Some people arrange parties at home and some people prefer to go out. And according to their tastes people enjoy parties by dance, music and drinks... Some big hotels, restaurants and clubs organize their special New Year parties. Shopkeepers keep special stocks in market during this time because people tend to go for shopping during this time. Even wine shopkeepers keep special stock as their sale rises to double.
People are very excited about this special evening. Every generation has its own way to celebrate. When asked a teenager, Kshitija Lokhande, 16, she answered that she wanted to celebrate this fabulous eve with her friends but her parents will not allow her to stay out until late night so she will be celebrating New Year eve with her family. According to her parents it is not safe to stay out until late night for girls especially on New Year eve as people may misbehave when they are drunk. But she thinks that her parents are too old fashioned and strict.
There is a generation gap which we can easily see about celebrating 31st December. There is a vast difference of perceptions between two generations. Senior citizens really don’t like the idea of celebrating New Year in this manner. For instance let’s take the example of Mrs. Anjali Gokhle, a retired professor, who says, “We are people who are born in India. It is not our culture to celebrate the New Year is this way. We are blindly following the western people. It is not our New Year even. According to Indian Calendar, we celebrate our New Year on Gudi Padwa and not on 1st of January. And even if the young generation wants to celebrate the New Year on 1st of January then they should not indulge themselves in loud music parties and taking alcohol. It is bad for them and society also. “But today’s young generation does not seem to care about anybody’s perceptions. Gaurav Jog an engineering student says that, “When all the world is celebrating the arrival of New Year on 1st of January, then it is simply a foolishness to ignore and not to celebrate it. We represent a globalized generation and we also must follow the trend. Off course it is bad to drink and drive but I guess there is no harm in celebrating the New Year unless we are not creating problems for anyone. When we know our limits then nobody should create any issue about our celebrations. “
Gaurav’s perception is not wrong. But some people really don’t care about other people around them and the society. They cross their limits and create nuisance for surrounding people. For such people the hotel managers also take very good care that such people should not be allowed to create a scene. The police department gives instructions to all the hotel and restaurant and clubs to take care on such crucial day when any accident can happen. When asked hotel Shivar Garden’s manager, Vijay Uttekar said that , “Every year the police department gives us instructions that for how much time the hotel and bar should remain open and for how much time we can play DJ music. We personally take care that no drunk person in allowed to enter in the premises of hotel and if someone sitting inside the bar seems to drink more than enough then we tell our waiters to not to serve any drink to that person.”
For such nuisance creating people, our police department has all the arrangement. When we asked senior police inspector Mahadev Chavan, chatushrungi police station, said that , “Every year we take good care of safety of people. Our guards are there to help on the road. We put barrels on the road so that no one should drive fast and face the accident. Plus we check that no one should drink and drive. And if someone is found committing such crime, immediate action is taken on them. This year we have arranged female guards on duty too so that we can check for female drunk drivers.”
When so many people are working for our safety then we must act responsible and follow the rules of our sake only. We must not break any rule and create problems for ourselves and people around us. It is our moral duty to respect each other’s safety and liberty. Have a good and safe time. Happy New Year!
Tuesday, February 10, 2009
प्रेम म्हणजे..
प्रेम म्हणजे....
दोस्तो...प्रेमाची सायंटिफिक व्याख्या करणं म्हणजे त्याच्यातली मजा घालवणं.प्रेम काय फिजिक्स , केमेस्ट्री अन् मॅथ्स आहे का प्रॅक्टीकलच्या आधी थेअरी शिकायला?प्रॅक्टीकली अनुभवल्याशिवाय प्रेम काय हे कोणीही सांगून कळत नाही.मुळात प्रेम म्हणजे काय ही सांगण्याची गोष्ट नाही.जसं गरम काय ,थंड काय हे जो तो अनुभवातून शिकतो तसंच प्रेम...प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं..तुमचं नि आमचं अगदी सेम असतं असं पाडगावकर म्हणतात.हीच लिंक पकडून काही प्रेमवीर म्हणतात , ''प्रेम म्हणजे ...रोज रात्री आकाशात तारा तुटतो का हे पाहाणं असतं..कारण त्या तुटणाऱ्या ताराकडे तो आपलाच व्हावा हे मागणं असतं.'' ''प्रेम म्हणजे..डोळे बंद केले तरी त्याचंच दिसणं असतं तर डोळे उघडताच त्याला शोधणं असतं..'' ''प्रेम म्हणजे ..प्रत्येक वेळी आपण शहाणे आहोत हे दाखवणं असतं.पण त्याच्यासमोर मात्रं वेडुपणाचं वागणं असतं.'' ''प्रेम म्हणजे..आपल्याला कधी न आवडणाऱ्या गोष्टी तो भेटल्यावर त्याला आवडतात म्हणून आवडणं असतं.'' ''प्रेम म्हणजे ..त्याच्या गुणांवर तर भाळायचंच असतं.पण त्यापेक्षाही त्याचे दोष स्वीकारणं असतं..'' प्रेमाची लिमिट पहायची आहे? मग हे ऐका.. ''प्रेम म्हणजे..त्याचं ह्या जगातलं अस्तित्व संपल्यानंतरही निव्वळ त्याला दिलेल्या वचनामुळे डोळयात अश्रू असून सुध्दा ओठांवर हसू ठेवणं असतं..''
दोस्तो..ज्याला कोणाची ही प्रेमाची लिंक मिळाली त्याचं बाकी जगाशी लिंक फेल्युअर झालंच म्हणून समजा..काही अरसिक सायंटिस्ट लोक ह्याला निव्वळ ''केमिकल लोचा'' म्हणून मोकळे होतात पण पर्वा किसे है? ज्याला हा खरं प्रेम ही दुर्मिळ कस्तुरी लाभली उसने सबकुछ पा लिया.प्रेमात पडल्यावर माणसात जमिन अस्मानाचा फरक होतो.सारं जग ''आवडत्या माणसापाशी'' केंद्रित होतं.
''आवडत्या माणसाचा फोन येतो अन् आजुबाजूचं सगळं कंटाळवाणं जग अचानक सुंदर वाटायला लागतं.आवडता माणूस साधंसंच काहीसं बोलतो अन् नेमकं ते आपल्याला आवडणारं निघतं.आवडत्या माणसाने म्हटलेलं गाणं खूप खूप सुरेल वाटतं.आणि आवडत्या माणसाच्या नुसत्या आठवणीनेही खोल खोल उरात दाटतं...म्हणूनच आयुष्यात कुणाशी तरी जुळावंच आवडतं असं नातं..कारण आवडत्या माणसाला आपणही आवडल्याने अवघं आयुष्यं सुंदर होऊन जातं..''पण मित्रांनो..प्रेमाचे सुध्दा काही प्रकार असतात बरं का!
तीव्र भावनाप्रवण प्रेम म्हणजेच पॅशनेट लव्ह..ह्यात माणूस आपल्या आवडत्या व्यक्तीबद्दल सतत अगदी दिवसाचा प्रत्येक क्षण विचार करत असतो.ह्यात काही प्रमाणात शारिरिक भावना सुध्दा अंतर्भूत असतात.आणि तीव्र प्रकारचे भावनिक चढउतार असतात.
दयाबुध्दी असलेलं प्रेम म्हणजे कंपॅशनेट लव्ह...ह्यात तुमच्या आवडत्या व्यक्तीसाठी तुमच्या मनात तीव्र दया , आपुलकी आणि काळजी असते.परंतू कमिटमेंट शिवाय कुठल्याच प्रेमाला अर्थ नाही.जोपर्यंत तुम्ही कमिटमेंट करून ती निभावत नाही तोपर्यंत तुमचं प्रेम नातं टिकणं निव्वळ अशक्य आहे.अनेक लोकांना प्रश्न पडतो की लव्ह ऍट फर्स्ट साईट हा प्रकार खरंच अस्तित्वात असतो का..तर त्यांच्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे की पहिल्यांदा होतं ते आकर्षण असतं.एखाद्या व्यक्तीला जोपर्यंत तुम्ही ओळखत नाही.त्याची स्वभाववैशिष्टयं , त्याचे विचार , त्याच्या वागण्या बोलण्याच्या पध्दती आणि त्याचे गुण अवगुण निदान काही प्रमाणात जाणल्याशिवाय तरी खरं प्रेम होऊ शकत नाही.ज्यांच्या बाबतीत लव्ह ऍट फर्स्ट साईट घडतं त्यांचं ते पहिल्यांदा निव्वळ आकर्षण असतं आणि काळाच्या ओघात एकमेकांच्या सतत सहवासामुळे एकमेकांना जाणून घेतल्यावर प्रेमाला खऱ्या अर्थाने सुरूवात होते.आणि तेच प्रेम शेवटपर्यंत टिकतं ज्यात एकमेकांविषयी नितांत आदर , समजूतदारपणा,माया , आपुलकी आणि टोकाची कमिटमेंट असते! अनेक लोकांना हा ही प्रश्न पडतो की सुरूवातीला फील गुड असलेलं वातावरण काहीच दिवसांत तणावग्रस्त का होतं?सुरूवातीला एकमेकांसाठी आपणच परफेक्ट मॅच आणि मेड फॉर इच अदर हे फिलिंग असतं..पण का काहीच दिवसांत एकमेकांशी पटेनासं होतं?तर मग पाहूया असं का होतं ते..मित्रांनो प्रेमाच्या नात्याच्या तीन स्टेजेस असतात.
पहिली स्टेज ः मेड फॉर इच अदर..
पहिली स्टेज म्हणजे अगदी सुरूवातीला तुम्ही एकमेकांसाठी परफेक्ट असण्याचा आटोकाट प्रयत्न करता.समोरच्याला आवडेल असंच बोलता ,वागता.समोरचा आपल्यामुळे दुखावल्या जाऊ नये म्हणून त्याच्या निगेटीव्ह गोष्टींकडे दुर्लक्ष करता.चुका विसरून जाता.आणि त्याच्या फक्त पॉझिटिव्ह गोष्टी तुम्ही हायलाईट करता.समोरची व्यक्ती सुध्दा एक्झॅक्टली सेम असंच वागत असते.ह्यामुळे होतं काय की एकमेकांच्या मनात एकमेकांविषयीच्या अपेक्षा खूप वाढून आपण समोरच्या व्यक्तीला नकळत गृहित धरायला लागतो.ह्यानंतर नातं पोहोचतं दुसऱ्या स्टेजमध्ये.
दुसरी स्टेज ः हे भगवान!ये मै कहाँ फस गया...
आता रिलेशनला भरपूर दिवस उलटले असतात आणि स्वप्नांमधली नवी नवलाई संपून आपण जरा प्रॅक्टीकल विचार करायला लागलो असतो..एकमेकांच्या प्रचंड प्रमाणात वाढलेल्या अपेक्षा पूर्ण करणं कठिण होऊन बसतं.मग ह्यातूनच जन्म घेतात अनेक प्रकारचे समज गैरसमज, रूसवे फुगवे , अपेक्षाभंग, भांडणं आणि मनस्ताप.असं प्रत्येकाच्याच बाबतीत घडेल असं नाही.पण बहुतांश नात्यांमध्ये असं होतं.ही दुसरी स्टेज नात्यातली सगळयात कठिण स्टेज आहे.कारण ह्या स्टेजमध्ये आपण एकमेकांच्या सगळयाच अपेक्षा पूर्ण करू शकत नाही.एकमेकांच्या चुका माफ करू शकत नाही.एकमेकांचे दोषच ते काय आपल्याला दिसतात आणि ''कुठुन ह्या रिलेशनमध्ये पडलो'' असं निगेटिव्ह फिलिंग येतं.छोटया छोटया गोष्टींमध्ये होणारे अपेक्षाभंग सहन होत नाहीत आणि मग नातं अतिशय नाजूक वळणावर येऊन ठेपतं.ह्या वळणावर जर एकमेकांविषयीचं तीव्र प्रेम जागृत राहिलं आणि कमिटमेंट स्ट्राँग असलं तर तुमचं जहाज ह्या वादळातून सहीसलामत बाहेर पडतं.पण एकमेकांविषयी विश्वास नसणे , नीट कम्युनिकेशन नसणे किंवा मॅच्युरिटीचा अभाव , इगो प्रॉब्लेम ह्यामुळे बरीचशी नाती ह्या दुसऱ्या स्टेजलाच येऊन तुटतात आणि विनाकारण लोकांचा प्रेमाविषयीचा विश्वास उडतो.ह्या कठिण स्टेजमध्ये एकमेकांना समजून घेऊन सोबत चाललं , आरश्यासारखी क्लिअरीटी ठेवली , प्रेम आणि विश्वास मनात जागृत ठेवला तर तुमचं नातं ह्या आगीतून तावून सुलाखून बाहेर पडतं व सगळे गैरसमज जळून जाऊन उरतं अस्सल शुध्द चोवीस कॅरेट सोन्यासारखं शुध्द प्रेम.
तिसरी स्टेज ःलव्ह इज हेवन..
दुसऱ्या स्टेज मध्ये एकमेकांच्या अपेक्षा आणि लिमिटेशन्स कळल्यावर जर दोघांचंही एकमेकांवर खरं प्रेम असेल तर ते एकमेकांना एकमेकांच्या गुणदोषांसकड स्वीकारतात.कारण ते एकमेकांशिवाय आयुष्याची कल्पनाही करू शकत नाहीत.दुसऱ्या स्टेजमधून मात्रं तिसऱ्या स्टेजमध्ये प्रयत्नपूर्वक यावं लागतं.सुृरूवातीला काही गोष्टी अगदी ठरवून कराव्या लागतात.एकमेकांच्या काही गोष्टी समजून घेणं , मॅच्युरिटीने वागणं , प्रयत्नपूर्वक नात्यात क्लिअरीटी ठेवणं , एकमेकांचा काही प्रमाणात गमावलेला विश्वास परत मिळवणं ह्यासाठी काही गोष्टी प्रयत्नपूर्वक जपाव्य लागतात.सुरूवातीला नातं टिकवण्यासाठी आणि नात्यातला ओलावा परत आणण्यासाठी ठरवून कराव्या लागणाऱ्या ह्याच गोष्टी नंतर एकमेकांवरच्या उत्कट प्रेमामुळे तुम्ही आपोआपच नकळत करू लागता आणि तुमचं नातं अतिशय स्ट्राँग होतं.तुम्ही पुन्हा पहिल्या स्टेजसारखे प्रेमाचा आनंद घेऊ शकता.एकमेकांविषयी वाटणारी काळजी , आपुलकी ह्यात मॅच्युरिटी आणि अंडरस्टॅंडिंग ची भर पडल्यामुळे तुम्ही दृष्ट लागण्यासारखे सुखी होता.प्रेमातच स्वर्ग आहे असं तुम्ही अनुभवता.तुमचं नातं ज्या क्षणाला दुसऱ्या स्टेजमधून तिसऱ्या स्टेजमध्ये प्रवेश करतं तेव्हापासूनच तुमचं नातं इतकं दृढ होत जातं की मग नंतर तुम्ही एकमेकांपासून कधीच दुरावल्या जात नाही.कोणीही तुम्हाला एकमेकांपासून तोडू शकत नाही.
दोस्तो प्रेम आणि आयुष्य दोन्हीही गोष्टी खूप सुंदर आहेत!
' प्रेम' केवळ अडीच अक्षरं…केवळ या अडीच अक्षरांच्या माध्यमातुन आपण आपल्या भावना व्यक्त करीत असतोअसं म्हणतात की मानव हा सदैवं प्रेमाचा भुकेला असतोत्याला असं सतत वाटत असतं की जगात एक तरी व्यक्ती अशी असावी जी त्याला किंवा तिला समजु शकेल,अशी एखादी व्यक्ती ज्या व्यक्तीजवळ आपण आपल्या भावनांचं शेअरींग करू शकू ,असं कुणी तरी ज्याच्या खांद्यावर डोकं ठेवून आपण आपल्या अश्रुंना वाट मोकळी करू शकू ,असं कुणीतरी ज्याच्यासोबत आपण मनमोकळेपणाने हसू शकू मित्रहो प्रत्येकालाच असं वाटत असतं
'' कोई होता जिसको अपना,हम अपना कह सकते यारो
पास नही पर दुरही होता,लेकीन कोई मेरा अपना''
प्रत्येकाला अशी एखादी 'खास' व्यक्ती जीवनात यावी ही ईच्छा असतेआणि त्यात वावगं असं काहीही नाहीकारण शेवटी हा मानवी स्वभाव आहेया संपूर्ण विश्वात केवळ मानवच असा आहे जो स्वतःच्या भाव-भावनांना वेगवेगळया तऱ्हेने मांडु शकतोस्वतःच्या भावनांना व्यक्त करणे हा काही गुन्हा थोडीच आहेत्या खासम खास व्यक्तीनं आपलं ऐकावं,सादास प्रतिसाद दयावा अशी आपली छोटीशी आशा असतेसुरेश भट म्हणतात की,
'' माझी उदास गीते तू ऐकतोस का रे? अन् आसवांत माझ्या तू नाहतोस का रे?
येताच तू समोरी मी दर्वळून जाते माझ्यासमान तूही गंधोळतोस का रे? ''
अशा व्यक्तीची आपण अगदी चातकाप्रमाणे वाट बघत असतोकधी-कधी तर आपण प्रत्येकामध्ये त्या 'खास' व्यक्तीला शोधत असतोअगदी निसर्गातील प्रत्येक घटकात आपण त्या व्यक्तीला बघत असतोएक दिवस असा येतो की आपल्याला हवी असलेली व्यक्ती मिळतेही तीच व्यक्ती असते ज्या व्यक्तीच्या प्रतिक्षेत आपण रात्रं-दिवस अगदी झुरत असतोती व्यक्ती आज आपल्याला मिळालेली असते अशा वेळी आपलं मन अगदी मनमयूर होवून नाचायलं लागतं आणि म्हणु लागतं
'' तू माझ्या आयुष्याची पहाट तू माझ्या कैफाची मत्त लाट
तू मागील जन्मांची आर्त साद तू मानसकुंजातील वेणूनाद''
हीच ती व्यक्ती असते जी आपल्याला समजु शकत असते,हीच ती व्यक्ती असते जिच्याजवळ आपण आपल्या भावनांचं शेअरींग करू शकतो,हीच ती व्यक्ती असते जिच्या खांद्यावर डोकं ठेवून आपण आपल्या अश्रूंना वाट मोकळी करीत असतोअगदी कधीही न हसणारे आपण खळखळून हसायला लागतो आणि कळत नकळत पणे आपल्याला जाणीव होते की हे दुसरं तिसरं काही नसून प्रेम आहे
'' मनी मनांशी प्रेमच केवळ आज निरंतर उरले आहे
बागेतल्या फुलांसंगे मन तुझ्याशी जूळले आहे''
मित्रहो असं म्हणतात की , प्रेमाचं गणित हे जरा वेगळंच असतं व्यवहारीक जीवनात भलेही एक आणि एक मिळुन दोन होत असतील पण प्रेमाच्या गणितात मात्र दोघे मिळून एक होत असतात असं हे प्रेमाचं गणित प्रत्येकालाच जमेल असंही नाहीआपण म्हणतो, ''शादी एक एैसा लड्डु है, जो खाए वो पछताए और जो ना खाए, वो भी पछताए'' काहीसं असंच प्रेमाचं असतं
'' आज माझा श्वासश्वास सुंगधकल्लोळ आज माझा शब्दशब्द प्रकाशाचा लोळ
विसराळू आयुष्याला पुन्हा सापडली तुझ्यामाझ्या कवितेची हारपली ओळ''
दोस्तो प्रेमाच्या या गणितात समाधान हे नसतंच मुळातकिंवा असं म्हणता येईल की समाधान आणि प्रेम हे समीकरण जुळुच शकत नाहीप्रेमात समाधान हे असूच शकत नाहीआपल्या मानवी स्वभावाचाच एक अंग म्हणजे समाधानी वृत्तीपण सुरूवातीलाच म्हटल्याप्रमाणे प्रेमाचं गणितंच निराळं आहे होतेव्हा मला या व्यक्तीकडून इतकं प्रेम मिळालं आता मी समाधानी झालो किंवा मला या व्यक्तीकडून इतकं प्रेम मिळालं तर मी समाधानी होणारअसं कधी कुणीही म्हणत नाही आणि म्हणु देखील शकत नाही कारण काय एक तर प्रेम हे कुठल्याही मानकात मोजले जाऊ शकत नाहीतसेच दुसरी गोष्ट म्हणजे कुठलीही भावना देखील मानकात मोजता येत नाहीतेव्हा आपण असं म्हणु शकतो की,प्रेमात समाधन नसतंच
'' अश्रू तुझ्या नयनांतील ओठांनी प्यायलो मी
प्रेमात तुझ्या सारी तृप्ती जाणलो मी''
असं जरी आपण म्हणण्यापुरतं म्हटलं तरी आपण आपल्याच मनाला विचारल्यास उत्तर येतं ते वेगळंचप्रेमाचं हे असंच असते होप्रेमात पडलेल्यांना स्वार्थ हा नसतोच मुळीअगदी तिच्यासाठी किंवा त्याच्यासाठी आपण काहीही करायला तयार होवून जातो
'' तुझ्या वाटेतले काटे मला उचलू दे
आणि फूलांनी सजवलेल्या वाटेवरपाऊल तुझे पडू दे''
दोस्तो समाधान आणि प्रेम हे समीकरण जुळूच शकत नाही हेच खरंआपण फक्त नि फक्त शुध्द,निर्मळ भावनेने प्रेम करीत रहावं
'' प्रेमाची मी रागिणी प्रेमात भिजव रे मला प्रेमाची मी भुकेली प्रेमात रंगव रे मला
प्रेमाचा हा खेळ असाच तू खेळत रहा दर दिवशी सकाळी असाच तू भेटत रहा''
Wednesday, December 10, 2008
help ...save the country
हेल्प...सेव द कंट्री...
कॅन वन इमॅजिन वर्किंग फॉर द फॉलोइंग कंपनी?
इट हॅज अ लिटील ओव्हर 500 एम्प्लॉइज वीथ द फॉलोइंग स्टॅटीस्टीक्स
29 हॅव बीन अक्युज्ड ऑफ स्पाउज अब्युज...
7 हॅव बीन अरेस्टेड फॉरफ्रॉड...
19 हॅव मोर दॅन थ्री क्रिमीनल केसेस पेंडींग अगेन्स्ट देम..
117 हॅव बीन चार्जड ऍन्ड आर बीइंग इन्व्हेस्टीगेटेड फॉर मर्डर , रेप , असॉल्ट , एक्सटॉर्शन , ऍन्ड रॉबरी.
71 कॅन नॉट गेट क्रेडीट ऑर लोन्स डयू टू बॅड क्रेडीट हिस्टरीज..
21आरकरन्ट डिफेन्डन्ट्स ऑन व्हेरीयस लॉसुट्स..
84 हॅव बीन इन्व्हॉल्व्ड इन ऑफेन्सेस ऍन्ड हॅव पेड फाईन्स..
कॅन यू गेस वॉट माइटी ऑर्गनाइजेशन धिस इज?
इट इज द 545 मेम्बर्स ऑफ द लोवर हाऊस ऑफ पार्लमेंट ऑफ इंडीया दॅट वर्कस फॉर यू ऍन्ड मी..द सेम गृप क्रॅन्क्स आउट हंड्रेड्स ऑफ लॉज डिजाइन्ड टू कीप द रेस्ट ऑफ अस इन लाइन..
कॅन वी डू समथिंग अबाऊट इट?
ऍट लीस्ट , वी वील स्प्रेड द वर्ड अराऊंड युजिंग धिस माइटी मिडीयम कॉल्ड इंटरनेट ऍन्ड इ मेल.
क्रिएट अवेअरनेस (ऍज इफ पिपल डोन्ट नो ऑलरेडी !!)
हेल्प...सेव द कंट्री...
सध्या हा एक इ मेल जवळपास सगळया इंटरनेट हाताळणाऱ्यांच्या मेल बॉक्स मध्ये फिरतो आहे.मित्रांनो तुम्हीही कोणाला गेल्या आठवडयापासून अशाच आशयाचा इ मेल फॉरवर्ड केला असेल.मुंबई मध्ये भारताच्या इतिहासातील सगळयात मोठा दहशतवादी हल्ला झाल्यापासून आपल्या सगळयांचे डोळे एकदम खाडकन उघडले.आपण आपल्याच शहरात किती असुरक्षित आहोत हे आपल्या मनावर पुन्हा बिंबवल्या गेले.हा हल्ला काय आणि कसा झाला हे तर तुम्हा सगळयांनाच माहिती आहे.पण ह्या हल्ल्याचे आफ्टर इफेक्ट्स सगळयात जास्त जाणवले असतील तर ते सरकारला होय.. आतापर्यंत गाढ झोपेत असलेल्या सरकारने सुध्दा त्वरीत पावलं उचलत चौकशी वगैरे सुरू केली आणि दहशतवादाला धर्म नसतो वगैरे वगैरे कमेंटबाजी सुरू केली..(एरवी ह्या नेत्यांना ही गोष्ट का नाही दिसत??) खुर्ची आणि सत्ता वाचविण्याच्या नादात आपण कुठे काय करतोय आणि काय बोलतोय ह्याचंही भान ह्या मंत्री लोकांना राहिलं नाही आणि त्यामुळे आतापर्यंत शांत असलेल्या जनतेचा संयम संपला..सहनशक्तीलाही काही मर्यादा असते हे जनतेने दाखवून दिलं..ह्या दहशतवाद नावाच्या रोगासाठी काय उपाय करायला हवे ह्याची चर्चा आता प्रत्येक घरांघरांतून होताना आपल्याला दिसतेय..
एकूणच सरकारचा निष्क्रीयपणा षंढपणा आणि स्वार्थीपणाचे उघडपणे अख्ख्या जगासमोर दर्शन घडल्यावर आता साध्या लहान पोराचा सुध्दा सरकारवर कणभरसुध्दा विश्वास राहिलेला नाही.सरकारच्या भरवशावर देशाची आणि जनतेची सुरक्षा सोपवली तर कसा घात होतो हे अनुभवल्यावर आता श्रीमंत असो वा गरीब , स्त्री असो वा पुरूष , वृध्द असो वा बालक सगळया जनतेचा एकच सूर आहे आणि तो म्हणजे ''बस..अबबहुत हुआ..''आता स्वावलंबन शिकायचे.सगळी सूत्रं स्वतःच्या हातात घ्यायची व स्वतःची आणि देशाची सुरक्षा स्वतःच करायची..आता जो कुणी ह्या स्वार्थी आणि षंढ सरकारवर अवलंबून राहिल तो संपला अशीच जनतेची मानसिकता सध्या तयार होताना दिसून येत आहे.
शाळा , कॉलेजेस मधल्या वर्गावर्गांत इतकंच नव्हे तर फाईव्ह स्टार हॉटेल पासून साध्या चहाच्या टपरीपर्यंत सगळे आता जागे झाले आहेत.आणि प्रत्येकाच्या मनात झालेल्या घटनेविषयी चीड तर आहेच पण ह्या सगळयात सरकारचा जो स्टॅंड होता आणि काही मं~yाांनी जे बेजबाबदार आणि अतिशय संतापजनक असे वक्तव्य केले शिवाय इतक्या मोठया घटनेचा सुध्दा राजकिय फायदा उठवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे जनतेच्या रोषात अधिकच भर पडून जनतेमध्ये राजकारणी लोकांच्या विरोधाची मानसिकता तयार होते आहे.जे जागे झाले आहे त्यांना एकत्र आणा आणि जे अजूनही भाबडेपणाने सिस्टीमवर अवलंबून आहेत त्यांनाही जागे करा असे प्रयत्न सुरू झाले आहेत.
्दोस्तो सुरूवातीलाच जो इ -मेलतुम्ही वाचलात हा त्या सगळयांना जागं करण्याच्या प्रयत्नातीलच एक प्रयत्न...हा मेल वाचून आपल्याला कळतं की आपण कोणाला विश्वासाने निवडून दिलं आहे आणि हे लोक तिथे काय देशाची वाट लावत आहेत.आपल्या देशाच्या सिस्टीममध्ये इतके गुन्हेगार आहेत हे तुम्हाला माहिती झाल्यावर तुमची रिऍक्शन काय असेल?हीच की सगळे सारखेच..कोणाला निवडून देणार?त्या पेक्षा वोटींगवर बहिष्कार टाकलेलाच बरा..
मित्रांनो् आपल्या मुंबईच्या मित्रांची रिऍक्शन ह्यापेक्षा काही वेगळी नव्हती...सगळयांची अशी एक मानसिकता तयार झाली आहे की ''तुम्ही राजीनामे देऊन कोणावर उपकार करत नाही आहात..आमचा आता कोणावरच विश्वास राहिलेला नाही.. यामुळे आम्हाला आता कोणत्याच पक्षाचा नेता नको.आम्ही वोटींग करणार नाही कारण कोणीच मत देण्यायोग्य नाही.'' 4 डिसेंबर रोजी मुंबईमध्ये जी लाखो लोकांची विशाल रॅली निघाली होती ती तुम्ही आम्ही सगळयांनीच बघितली.त्यात त्यांचा असाच सूर होता की '' इंडीया नीड्स लीडर्स ऍन्ड नॉट डीलर्स..'' आणि म्हणूनच त्या सगळयांनी अख्ख्या भारतीय जनतेला मतदानावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.
एस एम एस च्या आणि इ मेल्स च्या माध्यमातून सगळे एकमेकांना जागृत करण्याच्या कामाला लागले आहेत.त्या एस एम एस मधून सगळयांचा आपल्या शूर पोलिस आणि कमांडो आणि जवानांविषयीचा अभिमान आणि राजकारणी लोकांविषयीचा आत्यंतिक संताप दिसून येतो.
''थँक्स टू कॉप्स ऍन्ड कमांडोज, वी नीड नॉट वरी अबाऊट दोज हू हॅव केम थ्रू बोट्स..
बट , वी मस्ट वरी अबाऊट दोज हू कम थ्रू अवर वोट्स...''
किंवा ''फॉरगिविंग टेररीस्ट इज लेफ्ट टू गॉड... बट फिक्सींग देअर अपॉइंटमेंट वीथ गॉड इज अवर रिस्पॉन्सिबिलीटी..''
गेल्या आठवडाभरापासून हे आणि असे बरेच एस एम एस सगळयांच्या मोबाईल्सच्या इनबॉक्समध्ये आपल्याला सापडतीलच...अतिरेक्यांशी लढताना ज्यांनी आपले प्राण गमावले अश्या सगळयांना तर सरकारने देवत्व बहाल केले पाहिजे कारण ते देवदूतासारखे आपलं रक्षण करण्यास आले नसते तर आज हॉटेल ताज पासून तर पान टपरी पर्यंत सगळं हायजॅक झालं असतं..
ह्या शूरवीरांचा आदर करण्याचं आणि ज्यांनी आपले जवळचे लोक ह्या लर्र्र्ढाईमध्ये गमावले त्यांचं सांत्वन करण्याचं सोडून काही नेत्यांनीत्यांचा अपमान केला.
शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन्् ह्यांच्या घरच्यांचा जो अपमान केरळच्या मंत्रीमहोदयांनी केला ते पाहून तर जनतेच्या रागाने सीमा पार केली.आपल्या देशातल्या राजकारणी लोकांना अजूनही कशाला प्रायॉरिटी द्यायला हवी हे कळत नाही हे सुध्दा आता जनतेच्या मनाने घेरले आहे.आणि जनता ह्याची एकमेकांमध्ये चर्चा करते आहे की ''आपल्या देशात शूटर ऑलिम्पीकच्या खेळात गोल्ड मेडल मिळवतो व त्याला तीन कोटी रूपये व पुरस्कार दिल्या जातात.दुसरा शूटर अतिरेक्यांशी लढताना व देशाचे रक्षण करताना शहिद होतो.पण त्याच्या घरच्यांना मिळतात भीक दिल्यासारखे पाच लाख रूपये व अपमान...वाह रे आपला भारत !''
ही अशी सगळी मानसिकता सध्या देशामध्ये तयार होते आहे.प्रत्येक जण जागृत झाला आहे पण ही लाट आता अशीच कायम राहायला हवी.नाहीतर पुन्हा कुठला हल्ला होईपर्यंत जैसे थे!सगळे थंड होतील.असं व्हायला नको..आज भारत देशात सगळयात जास्त संख्या युवांची आहे तरीही का आपल्याकडे पोलिसांची कमतरता आहे? नुसता सरकारला दोष देऊन चालणार नाही.ह्यात आपणही कुठेतरी चुकतो.आता तरी ह्या चुका सुधारायला हव्यात.मला काय त्याचे ही प्रवृत्ती सोडायला हवी.प्रत्येकाने डोळसपणे सद्सद्विवेकबुध्दी वापरून मतदान केले पाहिजे.मतदानावर बहिष्कार टाकून उपयोगाचे नाही.शेवटी कोणाच्या हातात देश चालवायला द्यायचा हे अधिकार आपल्यालाच दिले आहेत.त्यामुळे आपण सुध्दा जबाबदारीने वागले पाहिजे.देशाच्या रा्जकारणात सक्रीय सहभाग तर घेतलाच पाहिजे.. शाहरूख ,हृतिकआणि कॅटरीना , करीना बनण्याची स्वप्न पाहणं खूप झालं..आता देशाला गरज आहे मेजर संदीप उन्नीकृष्णन् सारख्या शूर जवानांची आणि किरण बेदींसारख्या कर्तबगार पोलिस ऑफिसर्सची..आपल्यातूनचहे संदीप उन्नीकृष्णन् आणि किरण बेदी हजारोंच्या संख्येने निर्माण व्हायला हवेत...
''यह मुर्दो सी खामोश जिंदगी क्या जीना..अगर इस दुनिया मे रहना है तो कोहराम मचादो यारो...''
शेवटी गरज आहे ही जागृतीची लाट कायम ठेवण्याची आणि देशासाठी काहीतरी करण्यात प्रत्येकाने आपापला खारीचा वाटा उचलण्याची....
''रख हौसला बुलंद ये मनझर भी आएगा..प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा..
गिरते ही सही सवार मैदान ए जंग मे..वह तिल्फ क्या गिरेंगे जो घुटनो के बल चले...''
-------------vaidehi
--------------
राजेशाही -again...
सरकार वाचवण्यासाठी खासदारांना 25 कोटी रूपये वाटण्यात आले.जर ते 25 कोटी रूपये तुला मिळाले असते तर तू त्या पैश्यांचं काय केलं असतं ?गुजर , अकोला
मित्रा...25 कोटी ? एवढे पैसे मला कोण देणार आहे त्या दानशूर व्यक्तीचं आधी नाव सांग मला...अरे एवढं दानशूर कोण आहे त्याला प्रसिध्दी द्यायला नको का?एक बात बता यार..कही वो तू तो नही!मुझे करोडपती बनाने के चक्कर मे और कौन होगा यार? मला कोण देणारमित्रा...मला पैसे देऊन कोणाचं भलं होणार आहे?उलटा दोस्त बात तो ऐसी है के जो मला एवढे पैसे फुकटात द्यायला तयार होईल त्याला आधी तर मी पागलखान्यात नेऊन बसवीन..आणि एवढं होऊन सुध्दा जर मला कोणी 25 कोटी दिलेच तर मग मी लगेच तुला कॉन्टॅक्ट करेन...आणि त्यातले 50 टक्के तुला देऊन टाकेन..चल तू भी क्या याद रखेगा..बाकीचे पैसे तुलाच विचारून इन्व्हेस्ट करेन..अबमैने तो इतके पैसे अपनी अख्खी लाईफटाईम मे नही देखे.. मी काय कोणी नेता नाही ना त्यामुळे मला तर माहिती नाही काय करायचं असतं पैश्यांचं..नाही तर सबसे बेस्ट आयडीया..मी ते पैसे सरकारला दान देऊन टाकेन..बिचारे भिकारी झाले आहे सध्या... सगळयांकडून महागाई च्या रूपात पैसे उकळत आहे..नाहीतर असं करते ना.. ही जी सगळी टॅक्स न भरणारी मोठी मंडळी आहे ना..ज्यांच्या कडे त्यांच्या मर्सिडीज चा आणि बाकी प्रॉपर्टीचा टॅक्स भरायला पैसाच नाही अश्यांना मी दान करून टाकेन..तेवढंच मला पुण्य मिळेल गरिबांना मदत केल्याचं... माझं मन इतकं मोठं आहे ना की बिचाऱ्यांचं दुःख मला पाहावत नाही...आणखी बरंच काही काही करण्यासारखं आहे.ते मी मला खरोखर पैसे मिळाल्यावर सांगेनच..सो कॅश केव्हा पाठवतो आहेस तेवढं फक्त सांग..ओक्के? बाय..
rajeshahi.
ह्या भ्रष्टाचाराला कंटाळलो बुवा...राजेहो ..काही राजेशाही उपाय आहेत का ह्यावर ? केतन साळवे , नागपूर..
केतन साहेब...हा प्रश्न म्हणजे असा आहे की पहले मुर्गी या पहले अंडा..ह्या भ्रष्टाचाराला तर आम्हीही कंटाळलो आहोत हो...म्हणून तर त्या दिवशी मंदिरात गेल्यावर देवाला म्हटलं की जरा बघा बुवा डोळे उघडून...काय हालत झाली आहे तुमच्या भक्तांची...मी हे म्हणत असतानाच तिथे अचानक पुजारी काका अवतरले अन् मला म्हणाले..देवाकडे प्रार्थना पोहोचवायची आहे? एक अभिषेक करून टाकू आपण...हजार रूपये अभिषेकाचे आणि दोनशे एक्कावन्न माझी दक्षिणा...आता त्यांनी सरळ सरळ ऑफर दिल्यावर मी एकदा देवाकडे आणि एकदा त्या काकांकडे असं पाहिलं आणि तिर्थरूपांना विचारून कळवते असं म्हणून तिथून सटकले..म्हटलं यार..इथेही भ्रष्टाचार ?अब तो हाय कमांड को कंप्लेंट लेटर लिखनाहीच पडेगा असा विचार करून घरच्या देवाशी संवाद साधला..आता देवाने सुध्दा मंदिरात तो डायलॉग ऐकला असावा म्हणून त्याने पण माझ्या हाकेला प्रतिसाद म्हणून लगेच दर्शन दिलं..मी सरळ सरळ तू जो डायलॉग मारला तोच देवाला ऐकवला..तर देव म्हणे काय मागते गं..जरा काही सोपं माग...मला करता येण्यासारखं..शेवटी पाहतो बुवा प्रयत्न करून.असं म्हणून देव अंतर्धान पावला..आता देवापर्यंत तर मी कंप्लेंट पोहोचवली आहे.होईल काही ना काही..तूर्तास एक राजेशाही उपाय करून बघ..एक म्हणजे आपण कुठलंहीकामकरवून घेताना ऑफिसातल्या कर्मचाऱ्यांच्या बायकोच्या साडीची व्यवस्था करायची नाही..भलेही मग कितीही वेळ लागु देत..अबहम तो है टाईम के पक्के..वेळ कोण घालवेल त्यापेक्षा एक दोन नोटांमध्येकामहोत असेल तर बरं..सो हा उपाय तर कोणी करणार नाही..आज पुन्हा देवाशी संवाद साधते आणि टेंपररी उपाय त्यालाच विचारून तुला कळवते..ओक्के ?बाय...